मुंबईहून गोवा किंवा कोकणात जातानाचा पनवेल किंवा वडखळ नंतरचा हा थांबा चुकवू नका. महाड ओलांडल्यावर अगदी काही मिनिटांत डाव्या हाताला कामतांच हे हॉटेल तुमच्या स्वागताला सज्ज दिसेल .
पार्किंगसाठी भरपूर मोकळी जागा, बसण्याची चांगली सोय, नाश्ता व जेवणाचे भरपूर पर्याय आणि लांबच्या प्रवासातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छ स्वच्छतागृह ह्या सर्व गोष्टी इथे एकाच ठिकाणी आहेत.
इथे दक्षिणात्य पदार्थ छान मिळत असले तरी विठ्ठल वडा आणि बटाटेवडा खायला मात्र विसरू नका. विठ्ठल वडा हा देखील बटाटेवडाच पण दह्यात घातलेला. इथल्या वड्याबरोबर मिळणाऱ्या तीन प्रकारच्या चटण्याही लई भारी असतात. फार लांबचा पल्ला गाठायचा असेल तर इथे खायला थांबच कारण ह्या महामार्गावर नंतर फार चांगला हॉटेल लगेच लागत नाही.
No comments:
Post a Comment