हि जागा आणि जागेचा नाव दोन्ही गोष्टी भन्नाट आहेत.. अंबाला केंट रेल्वे स्थानकापासून अगदी जवळच बस स्थानकाला लागून हा धाबा आहे. सरदार प्रीतम सिंग ह्यांनी ४० वर्षापूर्वी सुरु केलेला धाबा इतका फेमस झाला कि सर्व जण त्यांचे नाव वापरू लागले. त्यामुळे ह्या जागी तुम्हाला प्रीतम सिंग नावाचे बरेच धाबे आढळतील त्यामुळे वरचे नाव नीट लक्षात ठेवा.
फार स्वछताप्रेमी असाल तर मात्र कदाचित तुम्ही येथे खाणार नाही.. पण इथला आलू प्याज पराठा आणि दही खाल्ल्यावर तो कळकट्ट धाबा सुद्धा तुम्हाला स्वर्गासामान वाटू लागेल.
इथले चिक्कण देखील अप्रतिम आहे.. धाब्याचा मेनू फार मोठा नाही काही ठराविक पण अतीव रुचकर पदार्थ तुम्हाला इथे चाखायला मिळतील.. तेंव्हा कधी अंबाला केंट भागात गेलात तर सकाळची न्याहारी इथे करायला विसरू नका. हा धाबा फक्त दुपारी ३ पर्यंतच उघडा असतो त्यामुळे संध्याकाळी येथे जाऊन फायदा नाही.
No comments:
Post a Comment